मुंबई : ‘स्टार प्रवाह’च्या ‘शतदा प्रेम करावे’ या मालिकेने एक वेगळे वळण घेतले आहे. सायली आणि उन्मेषच्या नात्यात रोहनच्या रूपाने एक अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे सायली आणि रोहनचे होणारे लग्न उन्मेष थांबवू शकेल, का याची उत्सुकता निर्माण झाली आहे. या मालिकेचा महाएपिसोड रविवारी (ता. १७) दुपारी एक आणि सायंकाळी सात वाजता दाखवला जाणार आहे.
सायलीला मिळवण्यासाठी रोहन कोणत्याही थराला जायला तयार आहे. म्हणूनच आपल्याबरोबर लग्न न केल्यास उन्मेषला उध्वस्त करण्याची धमकी रोहन सायलीला देतो. सायली घाबरून रोहनबरोबर लग्न करण्यास राजी होते; मात्र सायली आपल्याला का सोडून गेली, याचे कारण उन्मेषला कळत नाही. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या उन्मेषला खरे कारण कळेल का आणि सायली-रोहनचे लग्न तो थांबवू शकेल का, या प्रश्चांची उत्तरे प्रेक्षकांना महाएपिसोडमध्ये मिळणार आहे.